मंगळागौरीचे व्रत

श्रावणात केले जाणारे मंगळागौरीचे व्रत म्हणजे नवविवाहितेसाठी उत्साहाची, आनंदाची पर्वणीच. समवयस्क मैत्रिणींना, नातेवाईकांना जमवणे, पूजेचे विधी, गाणी, वेगवेगळे खेळ, थट्टामस्करी, खाणेपिणे, मैत्रिणींबरोबर जागरणे या सगळ्याला स्त्रियांच्या भावविश्वात खास स्थान आहे.
श्रावण हा धार्मिक व्रत-वैकल्यांचा पवित्र महिना. ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे’ या कवितेतील वर्णनाप्रमाणे श्रावण हा कुंद पावसाचा मन प्रफुल्लित करणारा महिना. अशाच प्रफुल्लित चित्तवृत्तींनी येते श्रावणातील मंगळागौर. मंगळागौरीस धार्मिक व सांस्कृतिक अशी दोन अंगे आहेत. प्रस्तुत लेखात आपण मंगळागौरीची या दोन्ही अंगांनी माहिती घेऊ  व हल्लीच्या जमान्यात त्याचे स्वरूप कसे बदलले आहे, यावरही नजर टाकू.
नवविवाहितेने श्रावण महिन्यात करण्याची जी धार्मिक व्रते पूर्वापार चालत आली आहेत त्यातील शिवामूठ, गोपद्म यासारखेच मंगळागौर हे एक व्रत. मंगळागौर या व्रताची परंपरा महाराष्ट्रासह भारताच्या अनेक भागांत आढळते. यात पूजाविधी व फलप्राप्तीचे सूत्र थोडय़ाफार फरकाने स्थलकालानुसार समान दिसते. उत्तर भारतात मंगळागौरीची मंदिरेही आहेत व तेथे श्रावण मंगळवारी जत्रा व उत्सव होतो. मंगळागौर हे प्रामुख्याने कौटुंबिक सुखसमृद्धीसाठी व्यक्तिगत पातळीवर करायचे व्रत आहे. मात्र महाराष्ट्रात या धार्मिक व्रताला सांस्कृतिक सामूहिकतेची अनोखी जोड लाभलेली दिसते. मंगळागौरीची ही सांस्कृतिक परंपरा, काळ झपाटय़ाने बदलत असला तरी, टिकून राहिली आहे. एवढेच नव्हे तर एरवी सर्वार्थाने आधुनिक व पाश्चात्त्य वळणाची जीवनशैली जगरहाटी म्हणून अनुसरलेल्या कुटुंबांमध्ये मंगळागौरीची ही सांस्कृतिक परंपरा जपण्याची व पुढे नेण्याची जाणीव आणि हौस दिसून येत आहे.
वर म्हटल्याप्रमाणे मंगळागौर हे नवविवाहितेने करण्याचे व्रत आहे. हे व्रत नवविवाहितेला अखंड सौभाग्य व तिच्या सासर-माहेरास सुखसमृद्धी लाभावी या भावनेने केले जाते. हे व्रत म्हणजे भगवान शंकराची पत्नी गौरी हिच्या पूजेचे व्रत आहे. हे व्रत श्रावण महिन्यातील मंगळवारी केले जाते म्हणून त्यास मंगळागौरी असे म्हटले जाते. मांगलिक व्रत म्हणूनही त्यास मंगळागौर म्हणता येईल. हे व्रत नवविवाहितेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करायचे असते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची विधिवत पूजा करायची व पाचव्या वर्षी आईला वाण देऊन व्रताचे उद्यापन करायचे, अशी प्रथा आहे. रूढीनुसार एक मंगळागौर माहेरची व एक सासरची अशी साजरी केली जाते. व्यावहारिक सोय म्हणून दोन्हीकडची एकच मंगळागौरही अनेक घरांमध्ये एकत्रित स्वरूपात केली जाते.
मंगळागौरीचे व्रत व्यक्तिगत असले तरी पूजा मात्र सामूहिक केली जाते. यात जिची मंगळागौर असेल तिच्यासोबत गावातील, नात्यातील, ओळखीपाळखीतील इतरही नवविवाहित मुलींना पूजेसाठी बोलाविले जाते. या सर्व मुली एक ते पाच वर्षांपूर्वी लग्न झालेल्या असाव्यात. जिची मंगळागौर असते ती सोडून पूजेसाठी येणाऱ्या इतर सर्व विवाहित मुलींना ‘वशेळी’ असे म्हटले जाते. पूजेला किमान पाच किंवा प्रत्येकाच्या हौस व कुवतीप्रमाणे कमाल कितीही ‘वशेळ्या’ बोलवाव्यात. मुलीने लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी श्रावणातील एका मंगळवारी अशा प्रकारे वशेळ्यांना बोलावून सामूहिक मंगळागौर पूजन करावे आणि पहिल्या वर्षांतील इतर श्रावण मंगळवारी व नंतरच्या वर्षांतील श्रावण मंगळवारी इतरांच्या मंगळागौरीला ‘वशेळी’ म्हणून पूजा करण्यासाठी जावे. पाचव्या वर्षी पुन्हा उद्यापनाच्या वेळी आपल्याकडे वशेळ्या बोलावून मोठय़ा प्रमाणावर मंगळागौर करावी. काही कारणाने पाचव्या वर्षी उद्यापन करायचे राहून गेले तर नंतर केव्हा तरी सोयीनुसार ते केले तरी चालते. श्रावण महिना ‘अधिक’ आला तर अधिक श्रवणात मंगळागौर करीत नाहीत. मंगळागौर हे आईने मुलीला लग्नानंतर दिलेले सौभाग्य व्रत असल्याचेही मानले जाते. म्हणूनच लग्नानंतरच्या पहिल्या वर्षीच्या श्रावणात पहिल्या मंगळवारी नवविवाहितेच्या माहेरी मंगळागौर करण्याची प्रथा रूढ झाली असावी. या वेळी आईवडिलांचा मान-सन्मान करून आशीर्वाद घ्यायचा असतो. नागदानाने संततीवर येणारे संकट टळते, अशी समजूत असल्याने या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी आईला नागप्रतिमेचे वाण देण्याची प्रथा आहे.
पूर्वी घरे मोठी, ऐसपैस असायची, त्यामुळे मंगळागौर घरातच पुजली जायची. आता विशेषत: शहरांत गरजेनुसार हॉल किंवा एखाद्या मंदिराची जागा भाडय़ाने घेऊन मंगळागौर केली जाते. तसेच बहुतांश मुली हल्ली नोकरी लागल्याशिवाय लग्नच करत नसल्याने लग्नानंतरची पहिली पाच वर्षे श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करणे त्यांना शक्य होत नाही. तरीही पहिल्या वर्षी सोयीनुसार श्रावणातील एका मंगळवारी घरची एक मंगळागौर अवश्य केली जाते. मंगळागौरीच्या निमित्ताने सासर-माहेरच्या मंडळींखेरीज इतरही आप्तेष्ट जमतात व मुळात धार्मिक असलेल्या या कार्यक्रमास ‘कौटुंबिक स्नेहमेळाव्यां’चे स्वरूपही येते.
गणपतीप्रमाणे मंगळागौरीच्या पूजेलाही २१ विविध प्रकारच्या झाडांच्या पानांची पत्री वाहण्याची पद्धत आहे. पत्री म्हणून वाहिली जाणारी ही पाने म्हणजे घराच्या परसदारात असलेल्या फुलझाडांची व औषधी वनस्पतींची पाने. नववधूने घरातील जाणत्या स्त्रियांसह परसदारात फिरून पूर्वी ही पत्री गोळा केली जायची. त्यानिमित्ताने घराच्या परिसराची, तेथील वृक्षवेलींची व त्यांच्या गुणवैशिष्टय़ांची ओळख व्हावी, ही यामागची कल्पना. हल्ली निगुतीने सर्व पत्री गोळा करण्याचा उत्साह फारसा कोणी दाखवत नाही. बाजारात फुलांसोबत जे काही पत्री म्हणून मिळते त्यावर भागविले जाते.
मंगळागौरीच्या दिवशी घरात पहाटेपासूनच लगबग सुरू होते. पूजा करणारी नवविवाहिता व घरातील इतर स्त्रिया शुचिर्भूत होऊन पूजेच्या तयारीला लागतात. पूजेनंतर नैवेद्य व जेवण असल्याने वशेळ्यांनाही लवकरच बोलावले जाते. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली यजमान नवविवाहितेसह वशेळ्या मंगळागौरीची षोडशोपचार पूजा करतात. पूजेनंतर आरती. प्रथम रिवाजाप्रमाणे गणपतीची व त्यानंतर मंगळागौरीची..
जय देवी मंगळागौरी,
ओवाळिन सोनियाच्या ताटी,
रत्नांचे दिवे, माणिकांच्या वाती,
हिरे या मोती-ज्योति,
मनोभावे करू आरती,
जय देवी मंगळागौरी..
आरतीनंतर प्रथम गणेशाची व त्यानंतर मंगळागौरीची कहाणी सांगितली जाते. इतर कथांप्रमाणोच या कथेतूनही मंगळागौरी व्रताचे माहात्म्य सांगितले जाते व ते केल्याने कसे भाग्य उजळते याचे सोदाहरण वर्णन केलेले असते.
पूजा, आरती व कथेनंतर नैवेद्य व जेवण होते. मंगळागौरीला षड्रस अन्नाचा नैवेद्य असतो. सहा चवींचे अन्न योग्य त्या संतुलित प्रमाणात ग्रहण करावे, याचे प्रतीक म्हणून हा नैवेद्य. मंगळागौरीच्या वेळी आग्रहाने पाळली जाणारी आणखी एक बाब म्हणजे यजमान नवविवाहितेने व वशेळ्यांनी काहीही न बोलता मुक्याने जेवणे. जणू मूकपणाने एकमेकांना समजून घेण्याची कल्पना यामागे असावी.
माहिती सौजन्य : लोकसत्ता

सुंदर टिपण

🔹🔶🔶"सुंदर टिपण"🔶🔶🔹
ची ज्योत
केव्हाही दक्षिणेकडे असू नये.

🌺◆ स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये.
🌺◆ देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील
टोपी काढावी.

🌺◆ शिवपिंडाला अर्धिच प्रदक्षिणा दोन्हीकडून
घालावी. म्हणजे एक प्रदिक्षणा पूर्ण होते.



🌺◆ गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा.रस्त्यातून
जाता येता किंवा गाडी जपू नये.


🌺◆ देवापुढे श्रीफळ (नारळ)
वाढवितांना शेंडीचा भाग नेहमी देवाकडे करावा.

🌺◆ निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये.

🌺◆ देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे
कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नयेत.

🌺◆ संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य
करू नये.

🌺◆ देवाला अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रोक्षण करून
तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही.

🌺◆ विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने
आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये.

🌺◆ शिव मंदिरात झांज, सुर्य मंदिरात शंख व
देवी मंदिरात बासरी वाजू नये.

🌺◆ द्वादशीस कधीही तुळस तोडू नये. तसेच रविवारी,
दुर्वा तोडू नयेत.

🌺◆ आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास
वापरण्यास देवू नये.

🌺◆ देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध
लावावे.

🌺◆ देवाला धूप दाखविताना धुपाचा धुर हाताने न
पसरविता पंख्याने पसरावा.

🌺◆ अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये.

🌺◆ उंबऱ्यावर बसून शिंकू नये.

🌺◆ निजलेल्या माणसास कधीही 
ओलांडून जावू नये.

🌺◆ मांजराना प्रेत ओलांडून देवू नये.

🌺◆ दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.

🌺◆ रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद आणू नयेत
किंवा दुसऱ्यास देवू नयेत.

🌺◆ सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत.
कारण त्यावेळी लक्ष्मी घरात येते अशी समजूत आहे.

🌺◆ रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा.

🌺◆ कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न
म्हणता येतो असे म्हणून निरोप घ्यावा.

🌺◆ एका हाताने देवाला नमस्कार करू नये.

💠आपल्या हिंदू धर्माची हि माहिती व संस्कृती सर्वांनी लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त इतरांना पाठवा.    
   💐 ॐ  नम  शिवाय  💐

मराठी कविता

पोरीची पसंती आली की 
बापाचं काळीज धडधडतं 
चिमणी घरटं सोडणार म्हणून 
आतल्या आत खूप रडतं

हसरे खेळकर बाबा एकदम 
धीर गंभीर दिसू लागतात 
पोरीला पाणी मागण्या पेक्षा 
स्वतःच उठून घेऊ लागतात 

या घरातला चिवचीवाट आता
कायमसाठी थांबणार असतो 
म्हणून बाप लेक झोपल्यावर 
तिच्याकडे पाहून रडत असतो 

अंबुच्या लिंबूच्या करत करत 
मोठी कधी झाली कळलं नाही 
बाप सांगतो तिलासोडून 
मला पाणीही गिळलं नाही 

दिवसातून एकदा तरी 
मायेनं जवळ घ्यावं वाटतं 
परक्याचं धन असलं तरी 
द्यायला मात्र नको वाटतं 

उठल्या पासून झोपे पर्यंत 
बाबाची काळजी घेत असते 
आज ना उद्या जाणार म्हणून 
पोरगी जास्तच लाडाची असते 

पोरगी जाणार म्हणलंकी 
बाप आतून तुटून जातो 
कळत नाही बैठकीतून 
अचानक का उठून जातो ?

इकडे तिकडे जाऊन बाबा 
गुपचूप डोळे पुसत असतात 
लेकीचं कल्याण झालं म्हणून 
पुन्हा बैठकीत हसत असतात 

तिचा सगळा जीवनपट 
क्षणाक्षणाला आठवत राहतो 
डोळ्यात येणाऱ्या आसवांना 
बाबा वापस पाठवत राहतो 

बी. पी. ची गोळी घेतली का ?
आता कोण विचारील गं ?
जास्त गोड खाऊनका म्हणून 
कोण कशाला दटवील गं ?

बाबा कुणाचं ऐकत नाहित पण 
पोरीला नकार देत नाहीत 
तिने रागात पाहिलं की मग 
ताटात गुलाबजाम घेत नाहीत 

एका अर्थानं पोरगी म्हणजे 
काळजी करणारी आईच असते 
पोटचा गोळा देणाऱ्याची 
कहाणी फार वेगळी असते..
=========================================
गोड कविता :

पंढरपुरात मंदिरात एकटी 
उभी रखुमाई पाहून...
मी फोनच लावला त्या 
सावळ्या विठूला न राहवून...

असा रे कसा तू विठू 
तुझ्या बायकोशी वागतोस...
तिला एकटीला सोडून का 
बाजूच्या मंदिरात उभा रहातोस...?

फोनवर तिकडून बोलताना 
विठूने मला सुंदर उत्तर दिले,
त्याचे गोड शब्द कानी ऐकताच माझे भानच हरपले...

"रोज भेटायला येऊन गर्दी 
करता ना तुम्ही सारे पाहुणे...
माझ्या सोबत उभी राहून 
कठीण होईल तिला आराम मिळणे..."

"शेजारच्या मंदिरात उभी राहून ती मला चोरून चोरून पाहते...
तिचे ते प्रेमळ पाहणे 
मला फार फार भावते..."

"नाजूकशी रखुमाई 
लाडकी आहे ना ह्या श्रीहरीची....
म्हणून काळजी घेत असतो 
मी माझ्या परीची...!!!

असं प्रेम हवं...नाही का...?

मैत्री

आयुष्यात संपत्ती कमी मिळाली
तरी चालेल

पण मैत्री अशी मिळवा
की कोणाला त्याची
किम्मत पण करता
येणार नाही.
💢💢💢

ऋतुवार


सत्यनारायण पूजा


मजेशीर

😃 मजेशीर कविता 😃
बशी म्हणाली कपाला
श्रेय नाही नशिबाला 
पिताना पितात बशीभर
अन म्हणताना म्हणतात कपभर...!
कप म्हणाला बशीला 
तुझा मोठा वशिला
धरतात मला कानाला
अन् लावतात तुला ओठाला...!!!

☕ * चला चहा प्यायला.* ☕
          शुभ सकाळ* 

सणवार


गृहप्रवेश


मंगळागौरी

कळी उमलते, खुदकन हसते
स्पर्श होता वाऱ्याचा
xxx रावांचे नाव घेते,
आग्रह होता सर्वाचा!

डोहाळ जेवण


सप्तपदी


लग्नातील उखाणे


वरा करीता


वधू करीता


गुडीपाडवा संदेश


जगण्यावरील संदेश

हे जगण्यातले खरे सौंदर्य..
जगणं किती अवघड आहे, 
डोक्यावरच्या ओझ्यावरूनही कळते आहे आणि तिच्या कुशीत वाढत असलेल्या बाळावरूनही. 
... पण ओझ्याने दबेल ती आई नव्हेच.
जगण्याच्या अवघडलेपणाचा लवलेशही तिच्या 
चेह-यावर नाहीय.
माझ्या मते जगण्यातलं अभिजात सौंदर्य यापेक्षा वेगळ असूच शकत नाही.
====================
" शब्द "
शब्द उभा करता 
आला पाहिजे, 
मनामनात ... गुढीसारखा 

शब्द झेलता
आला पाहिजे, 
शंकराने झेललेल्या ... गंगेसारखा 

शब्द गिळता 
आला पाहिजे, 
निळकंठाने प्राशलेल्या ... विषासारखा 

शब्द पेलता 
आला पाहिजे, 
रामाने पेललेल्या ... धनुष्यासारखा 

शब्द मोजता 
आला पाहिजे, 
उर्मिलेच्या ... क्षणांसारखा 

शब्द पुजता
आला पाहिजे, 
हनुमानाच्या ... भक्तीसारखा 

शब्द चाखता 
आला पाहिजे, 
शबरीने चाखलेल्या ... बोरासारखा 

शब्द जोडता 
आला पाहिजे, 
लंकेच्या ... सेतूसारखा 

शब्द भोगता 
आला पाहिजे, 
अश्वत्थाम्याच्या ... जखमेसारखा 

शब्द मागता 
आला पाहिजे, 
दुर्योधनाच्या ... हट्टासारखा 

शब्द तोलता
आला पाहिजे, 
बळीराजाने ... तोलल्यासारखा 

शब्द कोरता 
आला पाहिजे, 
अजंठाच्या ... मुर्तीसारखा 

शब्द फेकता 
आला पाहिजे, 
पुंडलिकाच्या ... विटेसारखा

शब्द बोलवता 
आला पाहिजे, 
ज्ञानेश्वराच्या ... रेड्यासारखा 

शब्द फडकवता
आला पाहिजे, 
शिवबाच्या भगव्या ... झेंड्यासारखा 

शब्द जपता 
आला पाहिजे, 

वहितल्या ... पिंपळपानासारखा 

बायको

“बायको”
तिचं आपल्या आयुष्यात येणं,
किती किती सुखद असतं…!
या नात्याला श्वासांशिवाय,
दुसरं कुठलंच नाव नसतं…!!
एका सुंदर क्षणी आपल्या,
घरामध्ये येते ‘ती’…!
तिचं अख्खं आयुष्यच _आपल्याला,
भेट म्हणून देते ‘ती’…!!
किती सहज बनवत जाते,
ती प्रत्येकाशी नातं….!
बघता बघता अनोळखी घर,
तिचंच बनून जातं….!!
सुखामध्ये दुःखामध्ये,


‘ती’च सोबत असते ना..!
सगळं सहन करून ती,
तुमच्यासाठीच हसते ना.?..!!

सकाळपासून रात्रीपर्यंत,
राबत असतात तिचे हात…!
सासू-सासरे, मुलं, घर..
सतत असतं तिच्या मनात…!!
चहा, दूध, नाष्टा, डबे,
आंघोळीला गरम पाणी…!


प्रत्येकाची करून कामे,
तिची मात्र मधाळ वाणी….!!
सगळ्यांत शेवटी झोपते ती,
सगळ्यांच्याही आधी उठून…!
दिवसभर राबण्यासाठी,
ताकद एवढी आणते कुठून.?..!!
घरामधलं सगळं आवरून,
कामांसाठी बाहेर पळते….!
घरामध्ये नसते तेंव्हाच,
तिची खरी किंमत कळते…!!
घर होतं अस्ताव्यस्त,
घरामध्ये नसते जेंव्हा….!
तिच्याशिवाय व्हायचं कसं…?
मनात आपसूक येतं तेंव्हा…!!
म्हणूनच ती परत येते,
घरामध्ये पदर खोचून….!
बोलून दाखवते मलाच ती,
वरती हे टोचून टोचून…!
की, ‘मी म्हणून टिकले…,
दुसरी केव्हाच गेली असती पळून….!
माझे महत्त्व येत नाही,
अजून कसे तुम्हांला कळून ?’..!!
राग-लोभ, रुसवे-फुगवे,
उणी-दुणी, मानपान…!
प्रत्येकाला घेते समजून,
जुळवून घेते कित्ती छान…!!
थकूनभागून आल्यावर ती,
हसून, चहा देते आणून…!
दिवसभराचे आपले कष्ट,
अलगदपणे घेते जाणून..!!
आयुष्यभर उपयोगी पडतं,
नेहमी तिचंच संसारी धोरण….!
म्हणून प्रत्येक घरात सजतं,
‘बायको’ नावाचं मखमली तोरण….!!
ती आहे म्हणून आहे,
आपल्या घरादाराला किंमत….!
तिला विरोध करण्याची इथं….
कुणात आहे हिंमत.?..!!
कुठून येतात आयुष्यात आपल्या,
इतक्या समजूतदार मुली.?..!
उगाच नाही म्हणत…
‘घरोघरी मातीच्याच चुली…!!’
क्षणांचीही साथ नव्हे,
साताजन्मांची ही सोबत असते….!
‘नवरा’ आयुष्यभर ‘नवरा’च राहतो,
‘नवरी मुलगी’ मात्र ‘बायको’ बनते….!!
==============================
🍁 तिला विचारलं नाही..🍁

ज्या क्षणी पाहिले तिला...
होकार गृहीतच धरला...!
मी तुला आवडलो का...?
तिला विचारलंच नाही...!!

सप्तपदी चालतांना...
घुटमळली पाऊले तिची...!
हुरहुर कसली होती...?
तिला विचारलंच नाही...!!

माप ओलांडतांना उंबरठ्याचं... 
मी आलो सहज आत...!
तुलाही यावंस वाटतंय का...?
तिला विचारलंच नाही...!!

झाली पहिली भेट...
किती आतुर होतो मी...!
ओढ तुलाही आहे का...?
तिला विचारलंच नाही...!!

वंशाला दिवाच हवा...
सांगून मोकळा झालो...!
पण आई व्हायचंय का...?
तिला विचारलंच नाही...!!

संगोपन करतांना मुलांचं...
कसरत होत होती तिची...!
गरज माझीही लागेल का...?
तिला विचारलंच नाही...!!

आयुष्यभर दिली साथ...
झाली सुख दु:खाची सोबती...!
कधी मन तिचं दुःखलं का...?
तिला विचारलंच नाही...!!

न मागताच तिच्याकडून...
घेतलं मी सारं काही...!
तुलाही काही हवं का...?
तिला विचारलंच नाही...!!

खरंच किती स्वार्थी झालो...
गृहीतच धरलं मत तिचं...!
तिचं मन काय म्हणतं...?
तिला विचारलंच नाही...!!


🍁सर्व महिलांना समर्पित 🍁

नवरा म्हणजे कोण

नवरा म्हणजे कोण ?

जे आहे ते सारं 
तुझंच म्हणत
सगळं 
स्वतःच्या नावावर ठेवणारा!

नवरा म्हणजे कोण?
मी तुझा गुलाम म्हणत
सगळी कामं करवून घेणारा..

नवरा म्हणजे कोण?
तुझ्या हाताला 
आईसारखी चव नाही 
म्हणत फर्माईशी करणारा!

नवरा म्हणजे कोण?
तू म्हणशील तसं करु 
म्हणत 
अंतीम निर्णय देणारा!

नवरा म्हणजे कोण?
रविवारभर टी.व्हीसमोर लोळून
सुट्टी साजरी करणारा...

नवरा म्हणजे कोण?
स्वतःची ढेरी नजरेआड करुन
बायकोचा बांधा सुटलाय म्हणणारा!

नवरा म्हणजे कोण
मी बायकोला
घाबरून आहे दाखवत
तिला शेंड्या लावायची
संधी शोधणारा!

नवरा म्हणजे कोण?
उधळलेल्या वारुला जणू
लग्नाचा लगाम घातलेला.

नवरा म्हणजे कोण?
पदरी पाडून पवित्र
मानून घेतलेला....

Marathi Jokes

**    G S T    **

पहिली बाई :" अग काय सांगू तुला ! आमच्याकडे  GST फारच आहे !

दूसरी बाई :" मी लकी आहे !आम्हाला GST अजिबात नाही !

तिसरी बाई :"अहो तुम्ही काय बोलताय कळेल का ?
    
पहिली बाई :"अग ती आमची कोड लँगवेज आहे !  G S T म्हणजे घरी  सासूचा  त्रास !! 😁
😆😂
=======================
हल्लीच्या मुलांपेक्षा 
डास जास्त संस्कारी आहेत…






सातच्या आत घरात!


😂😂😂
==============
संसारातले ३ खोटे शब्द.
.
.
.


ह्यांना विचारावे लागेल.
=========
दुःख वाटतं...जेव्हा

मित्राला रोज सकाळी दुधाची पिशवी  आणताना आणि कचरा टाकताना पाहतो.....😔😏
ज्याच्या लग्नात आम्ही आया है राजा या गाण्यावर डान्स केला होता....

😂😂😂
===========
नवरा बायको समोरासमोर बसून जेवण करत होते .

जेवण झाल्यावर नवरा उठला आणि त्याने स्वतःचे ताट धुवून आणले .

बायको नवर्‍याकडे रागाने पाहत म्हणाली :

केला ना इज्जतीचा कचरा ....

आपण आपल्या घरी नाही आहोत .

बाहेर हाॅटेलमध्ये जेवायला आलो आहोत
==========
. . . प्रेम म्हणजे. .  .  
 बस प्रवास केल्या सारखा 
असतो ...
 . . . . आणि . . . . . 
 . . . . लग्न म्हणजे  .विमानातुन प्रवास केल्या
सारखा असतो. 
 . . . . कारण   . . 
कंटाळा आला तर आपण 
बस मधुन उतरु शकतो पण

विमानातुन नाही.
===============
श्रीसत्यनारायण पूजेच्या वेळी बायकोने विचारलं - आरती आठवते ना?

नवरा - हो. पहिल्या मजल्यावर रहायची..! काय झालं तिचं?

पूजेआधीच प्रसाद!!!
😇😛😛😬😆😆
==================
व्हाटस एप वरुन माणसाचा स्वभाव-
१.ज्याचा डिपी स्थिर त्याचा स्वभाव शांत असतो.
२.वारंवार डिपी बदलणारे चिडचिड स्वभावाचे असतात.
३.छोटे व आयते स्टेटस ठेवणारे समाधानी वृत्तीचे असतात.
४.नेहमी स्टेटस बदलणारे आपले वर्चस्व दाखवतात.
५.पून्हापून्हा पोस्ट टाकणारे दिलदार मनाचे असतात.
६.कधीच कुणाला लाईक न करणारे समाधानी असतात.
७.इकडचे मेसेज तिकडे फिरवणारे राजकारणी असतात.
८.फोटो दिसताच ओपन करणारे अधीर स्वभावाचे असतात.
९.मेसेज वाचून प्रतिक्रिया न देणारे शांत व संयमी असतात.

१०.कामापुरते व्हाटसअप चालू ठेवणारे जीवनात यशस्वी होतात...
😀😂😂😜
==============================================
सासुबाई :- अगं सुनबाई, लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झालेल्या आहेत. आता घरी यायच्या आधी नाव घे बघू.

. सुन :- भाजीत भाजी ...

सासू :- ओ.. ओ.. सुनबाई, ही पकावगिरी सोडा आता. हे उखाणे जुने झालेत. जरा काहीतरी नवीन दमाच घ्या की....


सुन :- ""कडु कडु कारलं सासुबाईला चारलं...."" ""कडु कडु कारलं सासुबाईला चारलं.... नामदेव रावांच नाव घेते, 28एप्रिल ला बघ थेरडे, कटप्पा नं बाहुबलीला का मारलं..!
============================================
एक स्त्री ICU मध्ये होती.
तिचा नवरा कसा बसा आपले अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत होता.

तेवढ्यात डॉक्टर आले आणि म्हणाले

डॉक्टर: "आमचे प्रयत्न चालूच आहेत , पण काही सांगता येत नाही, तिचे शरीर काही योग्य प्रतिसाद देत नाहीये, बऱ्याच कोमाच्या रुग्णामध्ये ही लक्षणे आढळतात"
.
.
त्यावर मनाशी गाठ बांधून तो म्हणाला...

नवरा : "डॉक्टर तिला वाचवा हो, ती फक्त 30 वर्षाची आहे, मला आणि माझ्या कुटुंबाला खूप गरज आहे तिची 😢😢😢"
.
.
तेवढ्यात चमत्कारच घडला अस म्हणलं तरी चालेल,अचानक ECG मधून बीप बीप असा आवाज वाढला, तातडीने डॉक्टर आणि तिच्या नवर्याने तिच्या कडे धाव घेतली,

तिच्या हाताच्या बोटांची हालचाली स्पष्ट जाणवत होत्या आणि तीने हळूच ओठांची हालचाल करत म्हणाली:


.
30 नाही.. 29

 😂😂😂😂
===============================================
एकदा एका मुलाला त्याच्या आईने
शिकवण दिली की
मोठ्यांचा आदर करायचा

बसमध्ये गाडीत बसलेला असताना
एखादे आजी किंवा आजोबा उभे
असले तर त्यांना बसायला जागा द्यायची.

एके दिवशी मुलगा बसने
चालला होता व त्याने पाहिले जवळच एक आजी उभ्या आहेत.

तसा तो मुलगा उठला व
म्हणाला, "आजी बसा ना"

आजी म्हणाल्या,"नको"

थोड्या वेळाने पुन्हा म्हणाला 
"आजी बसा ना"

आजी रागानेच म्हणतात,
"नको म्हणाले ना एकदा,
तूच बस."

मुलगा थोडा वेळ गेल्यावर
पुन्हा आजीला विनवू लागला
"आजी बसा ना"

तशा आजी ओरडल्या,
आता परत बस म्हणालास
तर फटका देईन, तूच बस"

मुलाने घरी गेल्यावर
आईला सर्व गोष्ट सांगितली.

आई म्हणाली, "तू दारा जवळच्या सीटवर बसला असशील
आणि त्यांना दारात
बसायला भीती वाटत असेल."

मुलगा म्हणाला,
"नाही ग आई, मी दारात नव्हतो बसलो."

आई विचारते, "मग कुठे बसला होतास."

मुलगा म्हणाला -
.
.
.
.
.
.
"मी आपल्या आजोबांच्या मांडीवर
बसलो होतो."


😛😝😜
===================================
गण्या एकदा तळ्यात🌊 पडला..
.
बुडता बुडता त्याच्या हातात एक मासा 🐟आला...!
.
.
.
.
..
गण्याने त्याला पकडून बाहेर फेकून🐋 बोलला.
कमीतकमी तु तर आपला जीव वाचव..!!!

😜😜😜😜😂😂😂😂
===========================================

शुभ रात्री

जगाच्या या रंगमंचावर असे वावरा
     की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत vराहिल्या पाहिजे.!!
…❤🌙

"जगातील सर्वात महाग पाणी कोणते"
                  तर अश्रू .!!
कारण त्यात एक टक्के पाणी आणि,
     ९९टक्के भावना असतात".!!
"त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका"
 हसा,आणि हसवत रहा.... ....
❤🌙
     …………❣🌷❣………………

…❤🌙…शुभ रात्री …🌙❤

माहेरपण

नव-याने एकदा  विचारले.....
लग्नाला झाली वर्ष कितीतरी, अजून तुझे नवेपण
मला एकदा सांग तरी
असतं काय हे माहेरपण.
राणी माझ्या घरची तू
सासुरवास तुला न ठाऊक
करतेस काय मोठे तू
खास माहेरी "हितगूज"
सतत सगळ्यांशी असतेस connect,
smart phone हा दिमतीला
Sharing caring असतेस करत
whats app आहे संगतीला
Get together सदैव घडे
मैत्रीणींचा online झकास group
प्रवासाचे कष्ट घेऊन , आणखी काय मिळते सुख
आठ दिवस सुटटी घे
अन मस्त धमाल कर
shopping hotelling मनसोक्त करु
हवय कशाला माहेरपण
 तिने मधाळ हसत उत्तर दिले......
वर्ष सरोत कितिही ,
ओढ काही सरत नाही
सासरी गेल्याशिवाय खरंतर
माहेरपण कळत नाही.
सासरच्या सुखाच्या ओंजळीच मी
खरतर माहेरी उधळत जाते
अन त्याच आनंदाच्या घागरी
त्यांच्या डोळ्यातून रित्या करते.
दारात माझी वाट पाहणा-या
आजीची मग मी नव्याने मैत्रीण होते,
काल वेळेचे तिचे गणित मग माझ्या गप्पांतून जुळत जाते.
पिल्लं सोपवून आईकडे
मैत्रीणींचा जमतो कट्टा
कितीतरी जुन्यानव्या तासनतास मारतो गप्पा.
भेटीगाठीतून नव्याने मग अस्तित्वाच्या जुन्या खुणा शोधते,
माझी हरवलेली मी मला तिथेच सापडते.
आईने आठवणीने डब्यात भरुन ठेवलेला खाऊ अन बाबानी आणलेली आवडीची भाजी
मरगळ झटकुन मनाची मी होते ताजी.
आठवणीचे गोफ विणत लहान मी होत जाते
माहेरपण म्हणजे पुन्हा एकदा
बालपण मी जगून घेते...

माहेर

एका विवाहीत मुलीचे आईस पत्र.✍

🌸आई तुझी खुऽऽऽऽऽऽप आठवण येते......
आता माझी सकाळ 5.30 ला होते आणि
रात्र 12 वाजता.......
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
..
..
🌸सगळ्यांना गरम गरम जेवायला वाढते
आणि स्वतः मात्र शेवटी थंड जेवण जेवते...
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
.
.
🌸जेव्हा सासरी कुणी आजारी पडते..
तेव्हा त्यांच्या सेवेसाठी लगेचच हजर होते..
पण जेव्हा मला बरे नसते तेव्हा स्वतः ची काळजी स्वतःच घेते....
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
..
..
🌸रात्री सगळे झोपल्यावर त्यांना आठवणीने पांघरून घालते
पण जेव्हा मला पांघरूण घालायला कुणीही नसते....
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
.
.
🌸सगळ्यांच्या गरजा पूर्ण करता करता
स्वतः लाच विसरते..
पण मन मोकळं करायला जवळ कुणीही नसते...
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
..
..
🌸कदाचीत हीच कहानी लग्नानंतर प्रत्येक मुलीची होत असेल.....
लग्नाअगोदर प्रत्येक मुलगा मुलीला
वचन देतो...
लग्न झाल्यावर सासरी तुला आईची
आठवण येउ देणार नाही......
पण तरीही का ???.........
आई तुझी खुऽऽऽऽऽऽप आठवण येतेय ग...
माहेर म्हणजे काय ???
अशी एक जागा जिची किंमत तिथे असे पर्यंत कळत नाही.

🌸माहेर म्हणजे काय ???
अशी एक जागा जी पैश्यांनी विकत मिळत नाही.

🌸माहेर म्हणजे काय ???
अशी एक जागा जिथे कोण आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही.

🌸माहेर म्हणजे काय ???
अशी एक जागा जिथे कधी आपल्याला एकटं वाटत नाही.

🌸माहेर म्हणजे काय ???
अशी एक जागा जिथे रडणं हसणं खिदळणं खाणं पिणं या शिवाय आपण काही करत नाही.

🌸माहेर म्हणजे काय ???
अशी एक जागा जिचं स्थान पुरुषांना कधीच कळणार नाही.

🌸माहेर म्हणजे काय ???
अशी एक जागा जिथे "आई" नाही तर काही नाही.

व. पु. काळेंची आयुष्य बदलून टाकणारी २५ वाक्ये

१. गगनभरारीचं वेड

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

२. झुंज

वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

३. कॅलेंडर

भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकाम टेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.

४. संघर्ष कुठपर्यंत?

आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे...समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

५. पडावं तर असं!

आपत्ती पण अशी यावी कि इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा. पडायचंच असेल तर ठेच लागून पडून नये. चांगलं २००० फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहचला होता हे तरी जगाला कळेल.

६. परिपूर्णता?

जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..

७. नको असलेला भाग

दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने निसर्गातील इतर गोष्टींकडे पहा. झाडे, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.

८. पशू माणसांपेक्षा श्रेष्ठ

पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?

९. समस्या

अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दुध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्यातरी क्षणी लाट अंगावर यावी त्या वेगाने वर काठापर्यंत येते. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेवून ते खाली उतरवावं. तसच काहीसं अनेक समस्यांचं असतं.

१०. प्रोब्लेम्स कुणाला नसतात?

प्रोब्लेम्स कुणाला नसतात? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेच.ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसे. या तिन्ही गोष्टीं पालिकडचा प्रोब्लेम अस्थित्वात नसतो.

११. समोरच्याच्या दुःखाचे समाधान

समोरच्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल, त्याला दिलासा द्यायची इच्छा असेल तर तो जे बोलतो त्यातलं सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामा नये. कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याचा मूर्खपणाच कारणीभूत असतो. तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं. तो जे बोलतो ते जर सगळं ऐकू आलं त्यालाच एक झापड मारावीशी वाटते.

१२. आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन'

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा. यालाच आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन' असे म्हणतात.

१३. पळू नका

प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी न कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहचत नाहीत. मुक्कामाला पोहचतात ते सरळ रस्तेच.

१४. पाठीची खाज

पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी , आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बऱ्याचदा होते..

१५. माफी

माफी मागितल्याने तुम्ही चुकीचे होता आणि समोरची व्यक्ती बरोबर, हे कधीही सिद्ध होत नाही. माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यातच जास्त आहे.

१५. खर्च-हिशोब

खर्च झाल्याचं दुःख नसतं. हिशोब लागला नाही कि त्रास होतो.

१६. गैरसमज

गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकार करतो.

१७. शस्त्रक्रिया. भीती-अभिमान

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी प्रत्येक रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

१८. अपेक्षा-ऐपत

घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी पडते.

१९. अपयशाची भीती

माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच नाही मिळालं तर? याची त्याला भीती वाटते.

२०. खरी शोकांकिका:

बोलायला कोणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहचणं हि शोकांकिका जास्त भयाण.

२१. कौतुकाची खुमारी

कौतुकाला थोडी हेव्याची किनार असल्याशिवाय त्याला खरी खुमारी येत नाही.

२२. झरा आणि डबकं

वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!

२२. कागद-सर्टिफिकेट

सगळे कागद सारखेच! त्याला अहंकार चिकटला कि त्याचं सर्टिफिकेट होतं.

२३. रातकिड्याचा आवाज

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्यापेक्षाही जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही त्याचा होतो.

२४.फुगा किती फुगवायचा?

एखादा फुगा फुगवता फुगवता एका क्षणी फुटतो. तो फुटल्यावर समजतं, तो किती फुगवायला नको होता.

२५ हरवण्यासारखं घडवा

आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस 'माणूस' राहत नाही. परतून येतं ते चैतन्य!

 💐 💐👏👏🙏🙏👍👍
एखाद्या नवीन रस्त्याला कोणा नेत्याचे नाव देण्याऐवजी त्या रस्त्याच्या कंत्राटदाराचे नाव पत्ता आणि फोन नंबर दिला तर रस्ते आपसूक मजबूत आणि टिकाऊ होतील...
एक पुणेकर.