एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती.
.
थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला.
.
कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग एरिया"त जाऊन पुस्तक वाचत बसली.
.
तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते.
.
शेजारी बिस्किटाचा पुडा होता.
.
तिने एक बिस्कीट खाताच त्यांनी ही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन खाल्ले.
.
त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून तिचा पारा चढला.
“काय निर्लज्ज मनुष्य आहे हा!"
.
"माझ्या अंगी थोडी हिंमत असती,
तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!"
.
ती मनात विचार करत होती. 
.
दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते.
.
आता शेवटचे बिस्कीट उरले.
.
“आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल, 
का? 
मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’
.
ती विचार करत होती.
“आता हे अतिच झालं,”
असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर
जाऊन बसली.
.
थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक ठेवायला तिने पर्स उघडली.
.
पाहते तर काय, 

तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता.
.
आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली, 
याची तिला खूप लाज वाटली.
.
एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली होती.
.
तिने नजर टाकली, 
तर, 
शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले होते.
.

निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे; 
पण आपल्याला त्याची जाणीवच नसते.
.
दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का ???
.
कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात....!!!
.
"चांगली वस्तु"
"चांगली व्यक्ती" 
"चांगले दिवस"
यांची
"किंमत" 
निघुन गेल्यावर समजते...
"प्रेमाने" जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे "वैभव" ज्याच्याजवळ आहे, तोच खरा "श्रीमंत".
.
चार चौघात बसण्यापेक्षा,कधी कधी समुद्र किनाऱ्यावर किंवा निवांत ठिकाणी शांतपणे आठवणींना घेऊन बसावं.
.
आयुष्य जास्त सुंदर वाटत...
.
आपल्याला कोण हवंय,
यापेक्षा 
आपण कोणाला हवंय 
हे सुद्धा कधीतरी पहावं.
आयुष्य खरंच जास्त सुंदर वाटत...
.
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत, 
त्याच प्रमाणे,
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत, 
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
.
आयुष्य जास्त सुंदर वाटत...😊😊😊
=============================
☘लोखंडाच्या एका सळीची किंमत २५० रुपये.
त्यापासुन घोड्याचे नाल बनवले तर त्याचे मुल्य होते १००० रुपये.
त्यापासुन सुया बनविल्या तर त्याचे मुल्य होते १०,००० रुपये.
त्यापासुन घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग्ज बनविल्या तर त्याचे मुल्य होते १,००,००० रुपये.
तुम्ही स्वतः काय आहात यावर तुमचे मुल्य ठरत नाही. तर तुम्ही स्वतःला काय बनवता यावर तुमचे मुल्य ठरते..
आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचं हे आपल्याच हातात आहे.!!!
  "आपण एक दाणा पेरला असता, 
  आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ? 
धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं .
पण  निसर्गानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे. 
आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो.
अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ? 
दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल..,
आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काहीच शंका नाही!
"पेरणी चालू आहे.."
     काय पेरायच हेआपलआपणच ठरवायच 
  🙏
======================================
🔹🔶🔶"सुंदर टिपण"🔶🔶🔹

       लक्षात ठेवावे असे.🙏

🌺◆ देवासमोर लावलेल्या समईची ज्योत
केव्हाही दक्षिणेकडे असू नये.
🌺◆ स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये.
🌺◆ देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील
टोपी काढावी.
🌺◆ शिवपिंडाला अर्धिच प्रदक्षिणा दोन्हीकडून
घालावी. म्हणजे एक प्रदिक्षणा पूर्ण होते.
🌺◆ गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा.रस्त्यातून
जाता येता किंवा गाडी जपू नये.
🌺◆ देवापुढे श्रीफळ (नारळ)
वाढवितांना शेंडीचा भाग नेहमी देवाकडे करावा.
🌺◆ निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये.
🌺◆ देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे
कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नयेत.
🌺◆ संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य
करू नये.
🌺◆ देवाला अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रोक्षण करून
तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही.
🌺◆ विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने
आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये.
🌺◆ शिव मंदिरात झांज, सुर्य मंदिरात शंख व
देवी मंदिरात बासरी वाजू नये.
🌺◆ द्वादशीस कधीही तुळस तोडू नये. तसेच रविवारी,
दुर्वा तोडू नयेत.
🌺◆ आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास
वापरण्यास देवू नये.
🌺◆ देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध
लावावे.
🌺◆ देवाला धूप दाखविताना धुपाचा धुर हाताने न
पसरविता पंख्याने पसरावा.
🌺◆ अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये.
🌺◆ उंबऱ्यावर बसून शिंकू नये.
🌺◆ निजलेल्या माणसास कधीही 
ओलांडून जावू नये.
🌺◆ मांजराना प्रेत ओलांडून देवू नये.
🌺◆ दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.
🌺◆ रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद आणू नयेत
किंवा दुसऱ्यास देवू नयेत.
🌺◆ सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत.
कारण त्यावेळी लक्ष्मी घरात येते अशी समजूत आहे.
🌺◆ रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा.
🌺◆ कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न
म्हणता येतो असे म्हणून निरोप घ्यावा.
🌺◆ एका हाताने देवाला नमस्कार करू नये.
  👏👏👏👏👏👏👏👏
=============================================
 तात्वीक  भांडण सर्वांशी होते ,पण  "शत्रुत्व" कुणाशीचं   ठेवू नये...
      .खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, 
जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये..
     .एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता 
क्षणात "सुसंवाद" साधवा.
     ."अहंकार" हाच  या सर्वाच मुळ आहे, तो विनाकारण
  "बाळगुन जगू" नये..
       .शेवटी "मृत्यू" हे "सुंदर,शाश्वत वास्तव" आहे, 
त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.
      .आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा "आनंद "  उपभोग घेण्यासाठी 
याचे "स्मरण" ठेवू या.
       .आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा 
आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.
    ."एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" 
जागा करुन जाता आलं पाहिजे        
  🌺🌺शुभ सकाळ  🌺🌺